" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

तिवटग्याळ येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा*


*तिवटग्याळ येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा*

तिवटग्याळ - तिवटग्याळ येथे आज दिनांक 25/1/2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिना निमित्ताने गावातील मतदार नागरिकांना बोलावून उपस्थित सर्वांना मतदाराची प्रतिज्ञा शपथ घेण्यात आली. तद्नंतर BLO 278 भाग क्रमांक चे श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना या राष्ट्रीय मतदार दिना निमित्ताने सविस्तर माहिती दिली १८ वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. यामुळे आपल्या देशाची लोकशाही अधिक मजबूत राहीली आहे. २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहण्यासाठी या दिवशी मतदारांना मतदानाची शपथ दिली जाते.
दरवर्षी भारतामध्ये २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस (national voter day)साजरा केला जातो. सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे. लोकशाहीत मताला स्वतःचे महत्त्व आहे. कोणत्याही लोकशाही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे देशाचे उज्जल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरुक असणे गरजेचे आहे.
२५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारतात दरवर्षी निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोग दरवर्षी १८ वर्षांच्या तरुणांना ओळखपत्रे देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करते.राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवी पाटील यांच्याहस्ते सुरू करण्यात आला. १९५० मध्ये या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यामुळेच २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना त्यांच्या मताच्या शक्तीची जाणीव करून दिली जाते. या वेळी BLO श्री ज्ञानेश्वर बडगे,मतदार नागरिक श्री राजकुमार तोमर, भिमराव पाटील, गंगाराम पाटील, आदी जण उपस्थित होते. उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक तथा BLO ज्ञानेश्वर बडगे यांनी आभार मानले.








No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने  श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित* ------------------------------------- तिवटग्याळ...