Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, May 26, 2021

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या काही माहितिस्पद प्रश्न आणि त्यांची उत्तरे

💁‍♂️ *बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या काही माहितिस्पद प्रश्न आणि त्यांची उत्तरे*




🌕 २६ मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला व मानवतावादी धम्माचे आचरण करण्यास सांगितले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून बौद्ध धम्माबद्दल काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहुयात...



*१)* गौतम बुद्धांचा जन्म कधी व कुठे झाला ?
~ इसपू ५६७ लुम्बिनी 

*२)* गौतम बुद्ध कोणत्या वंशाचे होते ?
~ शाक्य

*३)* गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव होते ?
~ शुद्धोधन

*४)* गौतम बुद्धांच्या आईचे नाव होते ?
~ महामाया

*५)* गौतम बुद्धांच्या मावशीचे नाव होते ?
~ प्रजापती गौतमी

*६)* गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव होते ?
~ यशोधरा

*७)* गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव होते ?
~ राहुल

*८)* गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे दिले ?
~ सारनाथ

*९)* बौद्ध धम्मातील प्रमुख ग्रंथ कोणता ?
~ त्रिपिटक

*१०)* गौतम बुद्धांच्या गृहत्यागाच्या घटनेस काय म्हणतात ?
~ महाभिनिष्क्रमण



*११)* गौतम बुद्धांच्या मृत्यूच्या घटनेस काय म्हणतात ?
~ महापरीनिर्वाण

*१२)* गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीच्या घटनेस काय म्हणतात ?
~ संबोधि प्राप्ती

*१३)* गौतम बुद्धांना कोणत्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली ?
~ पिंपळ (बोधिवृक्ष)

*१४)* गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ?
~ गया (बोधगया)

*१५)* गौतम बुद्धांना कोणत्या नदीकाठी ज्ञानप्राप्ती झाली ?
~ निरंजना

*१६)* गौतम बुद्धांना कोणत्या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली ?
~ वैशाखी पौर्णिमा

*१७)* गौतम बुद्धांच्या पहिल्या प्रवचनास काय म्हणतात ?
~ धम्मचक्र प्रवर्तन

*१८)* गौतम बुद्धांचे महापरीनिर्वाण कधी व कोठे झाले ?
~ इसपू ४८७ कुशीनगर

*१९)* गौतम बुद्धांच्या अस्थीवर बांधलेल्या वास्तुस काय म्हणतात ?
~ स्तूप

*२०)* बौद्ध धम्मातील सुधारणावादी पंथ कोणता ?
~ महायान पंथ



*२१)* बौद्ध धम्मातील कर्मठ पंथ कोणता ?
~ हिनयान पंथ

*२२)* हिनयान पंथातील ग्रंथ कोणत्या भाषेत आहे ?
~ पाली, प्राकृत

*२३)* बोधिसत्व ही कोणत्या पंथातील संकल्पना आहे ?
~ महायान पंथ

*२४)* महायान पंथातील साहित्य कोणत्या भाषेत आहे ?
~ संस्कृत

*२५)* पहिली बौद्ध धम्म परिषद कधी व कुठे आयोजित करण्यात आली ?
~ इसपू ४८७, राजगृह

*२६)* पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?
~ महाकश्यप

*२७)* पहिल्या बौद्ध धम्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला ?
~ अजातशत्रू

*२८)* दुसरी बौद्ध धम्म परिषद कधी व कुठे आयोजित करण्यात आली ?
~ इसपू ३८७, वैशाली

*२९)* दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?
~ सर्वव्यामिनी

*३०)* दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला ?
~ कालाशोक



*३१)* कोणत्या परिषदेत बौद्ध धम्मात दोन गट निर्माण झाले ?
~ दुसरी धम्म परिषद

*३२)* बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?
~ बुद्ध, धम्म, आणि संघ

*३३)* तिसरी बौद्ध धम्म परिषद कधी व कोठे आयोजित करण्यात आली ?
~ इसपू २५५, पाटलीपुत्र

*३४)* तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?
~ मोगलीपुत्त तिस्स

*३५)* तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला ?
~ सम्राट अशोक

*३६)* चौथ्या बौद्ध धम्म परिषद कधी व कोठे आयोजित करण्यात आली ?
~ इसपू. १०२, कुंडलवण

*३७)* चौथ्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?
~ वसुमित्र

*३८)* चौथ्या बौद्ध धम्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला ?
~ सम्राट कनिष्क

*३९)* चौथ्या बौद्ध धम्म परिषदेचे उपाध्यक्ष कोण होते ?
~ अश्वघोष

*४०)* कोणत्या परिषदेत हीनयान व महायान पंथ निर्माण झाले ?
--------------------------
~ चौथी बौद्ध धम्म परिषद
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
--------------------------
*४१)* बौद्ध धम्मातील तांत्रिक पंथ कोणता ?
~ वज्रयान 

*४२)* बौद्ध धम्म स्वीकारणारा पहिला सम्राट कोण होता ?
~ बिम्बिसार

*४३)* बौद्ध धम्मात एकूण किती आर्य सत्य सांगितले आहे ?
~ चार

*४४)* सिद्धार्थ गौतम कोणत्या गणराज्याचे राजपुत्र होते ?
~ कपिलवस्तू

*४५)* कोणत्या नदीच्या पाणीवाटपावरून शाक्य-कोलिय यांच्यात वाद झाला ?
~ रोहिणी नदी

*४६)* महाभिनिष्क्रमणानंतर सिद्धार्थाने कोणाचे शिष्यत्व स्वीकारले ?
~ आलारकालाम

*४७)* बौद्ध धम्माचा स्वीकार करणारी वैशालीची प्रसिद्ध गणिका कोण होती ?
~ आम्रपाली

*४८)* गौतम बुद्धांनी बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी कोणती भाषा वापरली ?
~ पाली

*४९)* भारतातील शेवटचा बौद्ध सम्राट कोण होता ?
~ सम्राट हर्षवर्धन

*५०)* बौद्ध भिक्खुंच्या निवासस्थानांना काय म्हणतात ?
~ बौद्ध विहार

*५१)* पुरुषपूर येथील बौद्ध स्तूप कोणी बांधला ?
~ कनिष्क

*५२)* बौद्ध भिक्खुंच्या ध्यानसाधनेसाठीच्या गुहांना काय म्हणतात ?
~ चैत्य

*५३)* बुद्धचरित हा ग्रंथ कोणी लिहिला ?
~ अश्वघोष

काही सविस्तर माहिती 

🌕 *बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुध्दांविषयी थोडक्यात माहिती..*


🌷 नेपाळमध्ये (पूर्वीचा अखंड भारत) शाक्यांचं राज्य होतं. राजा शुद्धोधन हे या राज्याचे नेतृत्व करीत होते. या राज्याची राजधानी कपिलवस्तू हि होती. शुद्धोधन यांच्या पत्नीचे नाव महामाया (मायादेवी) असे होते. काही कथांनुसार गौतम बुद्धांच्या जन्माच्या आधी महामायाला एक स्वप्न पडले. या स्वप्नात तिला एक पांढरा हत्ती दिसला, ज्याला ६ दात होते. तो हत्ती तिच्या कुशीत शिरताना तिला दिसला. त्यावेळेस हत्ती हे चिन्ह भरभराटीचे मानले जायचे. त्यानंतर लुंबिनी मधील बागेत फिरताना एका झाडाच्या फांदीला लटकूनच माया देवी यांनी सिद्धार्थ ला जन्म दिला. माया देवी यांच्या निधना नंतर सिद्धार्थची मावशी महाप्रजापती गौतमी यांनी सिद्धार्थ याचा सांभाळ केला.

👩‍🍼 सिद्धार्थाच्या जन्मांतर एका ज्योतिषाने त्यांचे भविष्य वर्तवताना सांगितले होते कि, हा मुलगा एकतर चक्रवर्ती सम्राट होईल किंवा महान तपस्वी होईल. या भविष्यवाणीमुळे राजा शुद्धोदन यांनी राजपुत्र सिद्धार्थला अगदी लाडात वाढवले. बाहेरच्या जगातील दुख सिद्धार्थला कळू नये, म्हणून शुद्धोदन यांनी त्याला राजवाड्याबाहेर पडूच दिले नाही. सिद्धार्थ मोठा झाल्यावर त्याचे लग्न यशोधरा हिच्याशी लावून दिला. नंतर यांना एक पुत्ररत्न झाले व त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले. एके दिवशी सिद्धार्थ राजवाड्याबाहेर पडला आणि त्याने एक अंतयात्रा, रोग झालेली व्यक्ती आणि वृद्ध व्यक्ती बघितली. या प्रसंगामुळे त्याला जीवनाचे नश्वरत्व कळाले. पुन्हा राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्याने सर्व भौतिक सुखांचा, वैभवाचा त्याग करायचे ठरवले. वयाच्या २९ व्या वर्षी, एका रात्री आपल्या घोड्यावर बसून सिद्धार्थ राजवाड्याबाहेर पडला. त्याच्या ह्या क्रियेला महाभिनिष्क्रमण म्हणतात.

🧘‍♂️ ऐहिक सुखाचा त्याग करण्यासाठी सिद्धार्थने कडक मार्गांचा अवलंब केला. आत्मक्लेश करण्यासाठी अन्नपाण्याचा ही त्याने त्याग केला. या मुळे त्याचे शरीर क्षीण होत गेले. ह्या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणार नाही याचा अंदाज सिद्धार्थला आला व त्याने ध्यानाचा मार्ग निवडला. शरीर हे एक साधन आहे ते नाकारून चालणार नाही. म्हणूनच त्याने मध्यममार्ग निवडला व त्या गावातील सुजाता नामक स्त्री कडून शरीराला आवश्यक तेवढेच अन्न म्हणजेच दुध, खीर घेऊ लागला. बोधगया येथील पिंपळाच्या झाडाखाली बसून, जो पर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही, तोपर्यंत उठायचेच नाही असा निश्चय करून ध्यानधारणेला बसला. ४९ दिवसांच्या या तपश्चर्येनंतर ३५ व्या वर्षी सिद्धार्थला ज्ञानप्राप्ती झाली. इथून पुढे तो बुद्ध म्हणून 

🙏 अश्या ह्या ज्ञानी बुद्धांनी सारनाथ येथे आपले पहिले प्रवचन दिले, त्यालाच धम्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात. या प्रवचनात त्यांनी बौद्धधर्माची मूलतत्वे सांगितली. अशी अनेक प्रवचने दिल्यानंतर गौतम बुद्धांना अनेक शिष्य मिळाले आणि या सर्व शिष्यांच्या मदतीने गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माचा सर्वत्र प्रसार केला. भगवान बुद्धांनी आपल्या पाली भाषेतील प्रवचनात ४ आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग व पंचशील तत्वांचा अर्थ सामन्य लोकांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितला.

👬 कालांतराने भगवान बुद्धांनी धर्म प्रसाराकरिता बौद्ध संघ निर्माण केला. सुरुवातीला त्यामध्ये स्त्रियांना बंदी होती. मात्र गौतम बुद्धांचा शिष्य आनंद यांच्या विनंती नंतर स्त्रीयांनाही संघात प्रवेश मिळाला. इसवीसनपूर्व ४८३ साली, कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे वयाच्या ८० व्या वर्षी महापरिनिर्वाण झाले.

● *चार आर्य सत्य*

*१) दुःख :* मानवी जीवन हे दुःखमय आहे.
*२) तृष्णा :* मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.
*३) दुःख निरोध :* दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो.
*४) प्रतिपद् :* दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.

● *अष्टांगिक मार्ग :*

*१) सम्यक् दृष्टी :* निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
*२) सम्यक् संकल्प :* म्हणजे योग्य निर्धार, विचार.
*३) सम्यक् वाचा :* करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्‍न करणे.
*४) सम्यक् कर्मान्त :* उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
*५) सम्यक् आजीविका :* वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
*६) सम्यक् व्यायाम :* वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
*७) सम्यक् स्मृती :* तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
*८) सम्यक् समाधी :* कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.

● *पंचशील तत्वे*

*१)* मी जीव हिंसेपासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
*२)* मी चोरी करण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
*३)* मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
*४)* मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
*५)* मी मद्य, मादक गोष्टी तसेच इतर मोहांत पाडणाऱ्या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.

● *दहा पारमिता*

*१)* शील पारमिता
*२)* दान पारमिता
*३)* उपेक्षा पारमिता
*४)* नैष्कम्य पारमिता
*५)* विर्य पारमिता
*६)* शांती पारमिता
*७)* सत्य पारमिता
*८)* अधिष्ठान पारमिता
*९)* करूणा पारमिता
*१०)* मैत्री पारमिता 

➖➖➖➖➖➖➖➖
*श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगीर*
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment