" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

परीक्षेपूर्वी विद्यार्थी व पालकांनी घ्यावयाची काळजी

परीक्षेपूर्वी विद्यार्थी व पालकांनी घ्यावयाची काळजी
-------------------------------------------
     परीक्षा जवळ आल्या की ,विद्यार्थ्यांच्या  डोक्यावर ताण पडतो. तेव्हा आपल्या पाल्यांच्या डोक्यावर ताण येऊ देऊ नये यासाठी पालकांनी काही काळजी घेणे व विद्यार्थ्यांनीही संयमाने घेणे गरजेचे असून त्यामुळे परीक्षा सुरळीत देता येतील. त्यासाठी पालक व पाल्यानी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
         परीक्षा जवळ आल्या की, वर्षभर शाळेतून शिकवलेला अभ्यासक्रम व क्लासेसमधून पूर्ण झालेला अभ्यासक्रम यचो उजळणी करून न जमलेला अभ्यास परत शिक्षकाकडून करून घेणे गरजेचे आहे. शिक्षकांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित रित्या सांभाळली तर विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. विशेष म्हणजे या काळात पालकांनी आपल्या पाल्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होवू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच या काळात आपली पाल्य बाहेर पडणार नाहीत याची काळजी पालकांनी व गुरुजींनी घेणे गरजेचे आहे. बाहेर कोण्या पाहुण्याकडे व मित्रमंडळी कडे फिरकणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.बाहेरच्या वातावरणात आपला मुलगा गेला की, त्याचे परत अभ्यासात मन रमत नाही.या काळात पालकांनी आपल्या पाल्यांना मर्यादित जेवण द्यावे.बाहेरचे खाण्यापासून दूर ठेवावे.या कालावधीत त्याचे आरोग्य चांगले राहील याची काळजी घेताना घरचे जेवण पण माफक द्यावे.अन्यता या कालावधीत आपले  पाल्य आजारी पडल्यास त्याचे वर्ष वाया जाईल किंवा निकालावर परिणाम होईल.त्यासाठी आपल्या पाल्याचे जेवण नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.परीक्षेच्या काळात पालकांनी म्हणजे आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना परीक्षेसाठी पोषक वातावरण निर्माण करावे.अभ्यासासाठी प्रोत्साहीत करावे.त्यांना या कालावधीत रागावू नये.किंवा कामाचे ओझे लादू नये.परीक्षेत इतकी गुण मिळालीच पाहिजेत असा दबाव आणू नये. या सर्व बाबीसाठी थोडा वेळ पालकांनी पाल्यासाठी काढावा.आपल्या पाल्यांना वेगवेगळ्या विषयाचे पुस्तक नोट्स शिक्षकाकडून किंवा क्लासेसमधील शिक्षकाकडून चौकशी करून उपलब्ध करून द्यावीत.या कालावधीत आपल्या पाल्यांना किमान पाच तास तरी झोप घेवू द्यावे.तशी त्यांची व्यवस्था करावी जास्तीचे झोपणे किंवा जागरण करणे हे आरोग्यासाठी योग्य राहणार नाहीत.याच कालावधीत आपली पाल्य बाहेर कुठे फिरतात ? कोणासोबत फिरतात यावरही लक्ष ठेवावे.या कालावधीत आपली पाल्य अभ्यासू मुलांव्यतिरिक्त इतर मित्रांसोबत राहता कामा नये.यासाठी काळजी घ्यावी. कारण याकाळात अभ्यासाच्या दडपणाखाली आपली पाल्य वाईट मुलांच्या संगतीत राहिले तर त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल.आणि इतर गोष्टीकडे त्याचे लक्ष केंद्रित होईल म्हणून अशा मुलापासून आपली पाल्य दूर ठेवावीत ही पालकांची जबाबदारी आहे.याकाळात परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर घरातला टी. व्ही. बंदच ठेवावा आणि आपल्या पाल्यांना मोबाइल पासून दूर ठेवावे.आपली पाल्य टी. व्ही.पाहात बसली तर वेळ वाया जातो आणि मोबाईलमुळे इतरांना बोलण्यात वेळ जातो, युट्युब, गाणे पाहणे, गेम खेळणे यात बराचसा वेळ वाया जातो.त्यासाठी मोबाईल देऊ नये आणि काही काळ टी. व्ही.बंद ठेवावा.कारण याच्या वापराने वेळेचा अपव्यय होतो.
        पालकाएवढीच विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांचीही आहे.शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करावे.प्रत्येक विषयाची परत उजळणी करून घ्यावी.विद्यार्थ्यांना न जमलेला अभ्यास पुन्हा करून घ्यावा.अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्याव्यात.प्रत्येक विषयाचा आराखडा तयार करून अभ्यास पूर्ण करावा. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस नेण्यासाठी शिक्षक हा प्रयत्नशील असावा.विद्यार्थ्यांनीही शाळेतील शिकवणी, क्लासेसमधील शिकवणी पूर्ण झाल्यावर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अवघड धडे पुन्हा पुन्हा उजळणी करून घ्यावेत.संबंधित शिक्षकाला विचारून ते नीट समजून घेवून परिक्षेसाठी सज्ज व्हावे व भरघोस यश संपादन करावे.

       सुतार संतोष काशीनाथ
        स.शि. जि.प.प्रा.शा.डिगोळ
        ता.शिरूर अनंतपाळ
         जि.लातूर

No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न

*तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न* ---...