Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, January 29, 2024

दर्जेदार शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे




दर्जेदार शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे
-----------------------------

शिक्षणाचे महत्त्व आता पुन्हा समाजाला समजू लागले आहे. गावातील मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून पालक वर्ग मराठी माध्यमाच्या शाळा ऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देत आहेत. देशाची आर्थिक प्रगती, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती, राजकीय सामाजिक व औद्योगिक यासारख्या विविध क्षेत्रातील नेतृत्वाच्या निर्मितीसाठी, रोजगारांच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी दारिद्र निर्मुलनासाठी देशाला शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाची गरज दर्जेदार शिक्षण पूर्ण करू शकते. याकरिता कालबाह्य शिक्षण पद्धतीला दूर सारून नवनवीन शिक्षण पद्धती अवलंबून देश हिताकरिता सक्षम पिढी उभी करणे काळाची गरज झाली आहे. याकरिता गरज आहे ती कसदार शिक्षणाची. शासनाने ठरवून दिला अभ्यासक्रम मुलांना शिकवणे, त्यांच्याकडून पाठांतर करून घेणे आणि वर्षाच्या शेवटी परीक्षा घेणे इतकेच आजच्या बदलत्या जीवनशैलीत पुरेसे नाही. शिक्षणामुळे माणसाची अस्मिता जागृत होते. "मी कोण आहे"? याची जाणीव माणसाला शिक्षणामधून होते. शिक्षणामुळे माणसाला आत्मभान येते. त्याची आकलन शक्ती वाढते .दरवर्षी प्रशिक्षित इंजिनियर्स,डॉक्टर्स निर्माण करण्याच्या बाबतीत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी भारतीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकाचे आहे. जगात बौद्धिक भांडवलाच्या उपलब्ध बाबत भारताचे नाव आवर्जून घेतले जात असले तरी या देशातील एक तृतीयांश लोकसंख्या निरक्षर आहे. भारतात अति वेगाने वाढणाऱ्या खाजगी शाळांमध्ये विविध खेळांच्या दर्जेदार सुविधा  व  यासारख्या महागड्या सुविधा एकीकडे आहेत तर त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत अशा खाजगी शाळा पासून अगदी जवळच असलेल्या सरकारी जिल्हा परिषद शाळांमध्ये खडू आणि फळा यासारख्या शिक्षणाच्या मूलभूत सुविधाची वाणवा आहे. शिक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रातील अशा विसंगतीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. शिक्षणाइतके देशाच्या अर्थव्यवस्थेवर सर्वव्यापी परिणाम करणारे महत्त्वाचे घटक फारच कमी आहेत. भारतातील शालेय शिक्षण व्यवस्थेचे अपयश म्हणजे देश बांधणीच्या कार्यातील सर्वात मोठा अडथळा होय. शिक्षण व्यवस्थेच्या अपयश अपयशाचे पुरावे आपल्याला आपल्या आजूबाजूला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सहज फेरफटका मारल्यास सह दिसून येतात. यातही ग्रामीण भारताची शिक्षणाबाबतची परिस्थिती फारच वाईट अवस्थेत दिसून येते. या राष्ट्रीय धोक्याकडे वेळीच लक्ष देणे तितकेच गरजेचे झाले आहे.
-----------------------------
*मुख्याध्यापक*
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता.उदगीर*
-----------------------------

No comments:

Post a Comment