" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

शिक्षणसेवक काळातील काल्पनिक वेतनवाढ मिळण्यासाठी मा. आ. सुजीतसिंह ठाकुर यांची शिक्षणमंत्री मा. ना. दीपक जी केसरकरांना मागणी आमदाराचे पत्र .....अतिशय रास्त मागणी

शिक्षणसेवक योजनेतुन शिक्षक झालेल्या शिक्षकांना काल्पनिक तीन वेतनवाढी राज्यातील शिक्षणसेवक योजनेतुन शिक्षक झालेल्या शिक्षकांना काल्पनिक तीन वेतनवाढी देऊन मुळ वेतन 'लागु करणेबाबत. आमदारांचे पत्र .

दि. ०६/११/२०२३
प्रति,
मा. ना. श्री. दिपकजी केसरकरसाहेब,
शालेय शिक्षण आणि मराठी भाषा- मंत्री,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.

महाराष्ट्र राज्यात १० मार्च २००० रोजीचा शिक्षणसेवक भरती शासन आदेश, त्यापुर्वीचे शासन शासन आदेश व नंतरचे सुधारीत शासन आदेशाद्वारे राज्याची आर्थिकस्थिती नाजुक असल्याने तसेच इतर राज्यातील भरती प्रक्रिया अभ्यास करून तत्कालीन राज्य शासनाने शिक्षणसेवक पद भरती प्रक्रिया राबवली होती.
त्यात पाच वर्ष दरमहा केवळ अडीच हजार तुटपुंजे मानधन देण्यात आले. नंतर पाच ऐवजी तीन वर्ष तीन हजार रूपये मानधन केले. तीन वर्ष मानधन तत्वावर सेवा करून शिक्षक पदावर रूजु झाले. त्यानी केलेली सेवा सेवानिवृत्तीवेतन तसेच सेवानिवृत्तीनंतरचे देय फायदे यासाठी ग्राहय धरण्यात येणार आहे. तसेच १२ वर्षे सेवा झालेल्यांसाठी वरीष्ठ चटोपाध्याय श्रेणीसाठी ग्राहय धरण्यात आली आहे.

मात्र तीन वर्ष केलेली सेवा प्राथमिक शिक्षक पदावर नेमणुक करताना तीन वर्षाच्या वेतनवाढी देण्यात आल्या नाहीत. तरी या तीन वेतनवाढी देऊन प्रथम नेमणुकीपासुन तीन काल्पनिक वेतनवाढी ग्राहय धरून प्राथमिक शिक्षक पदावर मुळ वेतन धरण्यात यावे व आजपर्यंतचा फरक अदा करून नव्याने वेतन निश्चीत करण्यात यावा. आज पर्यंत शिक्षकांना गोपनिय अहवाल उत्कृष्ट श्रेणीनुसार किंवा राज्य, देश पातळीवरील पुरस्कार प्राप्त केलेल्या शिक्षकांना एक किंवा दोन वेतनवाढी देण्यात आल्या आहेत.

 सर्व शिक्षण सेवकांनी राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसताना चांगली सेवा बजावली आहे. विशेषबाब म्हणजे धाराशिव जिल्हयातील शिक्षण सेवकांनी देशात प्रथम भूम, परंडा, वाशी ई-लर्निंग तालुके म्हणुन नावलौकीक मिळवला आहे. तसेच राज्यातील सर्व तरुण शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणात तंत्रस्नेही म्हणुन महत्त्वाची भुमिका बजावली आहे.

तरी ग्रामीण भागातील शेतकरी मजुर कष्टकरी वर्गातील मुलांच्या शिक्षणासाठी अविरत सेवा देणाऱ्या सर्व शिक्षण सेवक यांना शिक्षक होताना तीन काल्पनिक वेतनवाढी देऊन मुळ वेतनही लागु करण्यात यावे, हि विनंती.

आपला,
(मा. आ. सुजितसिंह ठाकूर )



No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न

*तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न* ---...